Author: Amit Asodekar

  • ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत रेल्वे तिकिट दलालाला भुसावळ स्टेशनवर रंगेहात पकडले

    ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत रेल्वे तिकिट दलालाला भुसावळ स्टेशनवर रंगेहात पकडले

    रेल्वे पोलिसांनी (RPF) ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत आज भुसावळ रेल्वे स्थानकावर तिकीट दलाली करत असलेला मोहम्मद युसुफ खाटिक या व्यक्तीस रंगेहात पकडले.त्याच्याकडे २१ मे २०२५ च्या सचखंड एक्सप्रेसचे स्लीपर तिकीट आणि रिकामे आरक्षण पत्रक मिळाले. चौकशीदरम्यान त्याने तिकीटाच्या मूळ किमतीव्यतिरिक्त २०० रुपये रोख दलाली घेतल्याचे मान्य केले.

    अवैधरित्या प्रवाशांचे तिकीट बुक करणारा मोहम्मद युसुफ खाटिक याच्याकडे कोणतेही एजंट परवाना नसल्याचे चौकशीत उघड झाले. RPF ने त्याच्याकडून संपूर्ण पुरावे जप्त केले आहेत. तपासाअंती आरोपीविरुद्ध रेल्वे कायदा कलम १४३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनिरीक्षक धर्मेंद्र तिवारी करत आहेत.

    रेल्वे तिकीट दलालांनी प्रवाशांना मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे आकारून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. ‘ऑपरेशन उपलब्ध’ अंतर्गत भुसावळ स्थानकावर केलेली अटकेची कारवाई ही या दलाल प्रवृत्तींना चपराक ठरत आहे.

    रेल्वे प्रशासनाची स्पष्ट सूचना – ‘फक्त IRCTC अधिकृत मार्गानेच तिकीट बुक करा

    ’या घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, फक्त अधिकृत IRCTC पोर्टल, मोबाईल अ‍ॅप किंवा अधिकृत एजंटांमार्फतच तिकीट बुक करावे. अनधिकृत व्यक्तींशी व्यवहार केल्यास आर्थिक व कायदेशीर नुकसान होऊ शकते.

  • भुसावळमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर अभिनंदन शौर्य यात्रा’२४ मे रोजी भुसावळमध्ये होणार नारीशक्तीचा भव्य जागर

    भुसावळमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर अभिनंदन शौर्य यात्रा’२४ मे रोजी भुसावळमध्ये होणार नारीशक्तीचा भव्य जागर

    भुसावळ (प्रतिनिधी):भारतीय सैन्याची शक्ती आणि मातृशक्तीचा संगम ‘ऑपरेशन सिंदूर अभिनंदन शौर्य यात्रा’च्या रूपाने भुसावळ मध्ये साकार होणार आहे. २४ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता ग्रामदैवत अष्टभुजा माता मंदिर येथून शौर्य यात्रेला सुरुवात होईल आणि समारोप मरीमाता मंदिर, सातारापर्यंत होईल.या यात्रेमध्ये भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय हवाई दलातील विंग कमांडर वेमिका सिंग यांच्या दुर्गारुपी शौर्याचा सन्मान केला जाणार आहे. दुर्गा वाहिनी आणि मातृशक्ती यांच्या वतीने आयोजित या यात्रेत शहरातील महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत

    ऑपरेशन सिंदूर अभिनंदन शौर्य यात्रा’च्या निमित्ताने मातृशक्ती आणि दुर्गा वाहिनीच्या सर्व सदस्यांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक मंडळाकडून करण्यात आले आहे.या शौर्य यात्रेचा उद्देश केवळ सैनिकी शौर्याला सलाम करणे नसून, भारतीय स्त्रीशक्तीची एकजूट, जागरूकता आणि राष्ट्रभक्तीचे दर्शन घडवणे हा देखील आहे. आपल्या देशाच्या रक्षणासाठी सतत सज्ज असलेल्या जवानांचा सन्मान करण्यासाठी प्रत्येक महिलेला या यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळत आहे.”आपली उपस्थिती म्हणजे वीर जवानांना एक नमन, आणि भावी पिढीला एक प्रेरणा!” अशा शब्दांत दुर्गा वाहिनीच्या नेतृत्त्वाकडून भावनिक आवाहन करण्यात आले आहे.

  • जामनेर रोडपासून गांधी पुतळ्यापर्यंत तिरंगा रॅलीने शहरात देशभक्तीची लहर

    जामनेर रोडपासून गांधी पुतळ्यापर्यंत तिरंगा रॅलीने शहरात देशभक्तीची लहर

    भुसावळ : शहरात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सहभाग घेतला.जामनेर रोडवरील बियाणी मिलिटरी स्कूलपासून सुरू झालेल्या या रॅलीचा समारोप यावल रोडवरील गांधी पुतळ्याजवळ करण्यात आला. रॅलीदरम्यान देशभक्तीपर गीते, घोषणांनी शहरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा धारण करून देशप्रेमाचे संदेश दिले. या उपक्रमामुळे शहरातील नागरिकांमध्ये एकात्मतेची भावना वाढीस लागल्याचे पाहायला मिळाले.

  • जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त 70 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन

    जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त 70 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन

    भुसावळ (प्रतिनिधी):जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या 34 व्या वर्धापन दिन आणि केंद्रीय क्रीडामंत्री तथा खासदार रक्षाताई खडसे यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य 70 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन भुसावळ तालुक्याचे आमदार व महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योग मंत्री श्री. संजयजी सावकारे यांच्या हस्ते थाटात पार पडले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर, भारतीय जनता पार्टी भुसावळ उत्तर विभाग शहर अध्यक्ष संदीप सुरवाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष संतोष चौधरी यांचा समावेश होता.स्पर्धेत आज गटातील सर्व सामने खेळविण्यात आले असून, उद्या पासून बाद फेरीचे रोमांचक सामने खेळले जाणार आहेत. 11 मे ते 13 मे दरम्यान आयोजित या स्पर्धेत जय मातृभूमी क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व खेळाडू संपूर्ण मेहनत घेत असून, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

  • वासुदेव जेष्ठ नागरिक संघात संगीत संध्या उत्साहात

    वासुदेव जेष्ठ नागरिक संघात संगीत संध्या उत्साहात

    आयुष्य हे जबाबदारी पार पाडण्यात खर्ची झाले,आता निवृत्त जीवन जगतांना आपल्या सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करावे असे प्रतिपादन प्रमोद बोरोले यांनी आज वासुदेव जेष्ठ नागरिक संघाच्या मासिक सभेत केले.

    रिंग रोड येथील योग केंद्रात वासुदेव जेष्ठ नागरिक संघाची मासिक सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्रकाश पाटील,धनराज पाटील, भानुदास पाटील, आदी उपस्थित होते.पुढे प्रमोद बोरोले म्हणाले की,वासुदेव जेष्ठ नागरिक संघाने आज आपल्याला आपले कलाकौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.ही एक आपल्या सुवर्ण संधी आहे.

    संगीत संध्याला प्रभाकर झांबरे यांनी शंख ध्वनी करून कार्यक्रमास सुरुवात केली.यानंतर पी.जी. पाटील यांनी भगवद्गीतेतील अध्याय 15 पुरुषोत्तम योग म्हणून झाल्यावर गणेश सरोदे यांनी भजन तर भास्कर खाचणे गवळण सादर केली.प्रभाकर झांबरे मनोगत व हास्ययोग तर आर.एल.चौधरी यांनी आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या विविध मुद्रा करून दाखवल्या.प्रमोद बोरोले यांनी भजन सोबत ज्ञानेश्वर पाटील यांनी भक्ती गीत म्हंटले. असे विविध कलाकौशल्य सादर करण्यात आले.संजय चौधरी यांनी आभार मानले.विश्व कल्याण साधनारी प्रार्थना होऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.यावेळी विश्वनाथ वाणी,सुरेश बुलाखी बेलसरे,पुंजू भारंबे ,दिनकर शंकर पाटील, रमण भोगे,प्रमोद बोरोले,आर एल चौधरी, लोटू फिरके,इंदुबाई सपकाळे, खुशाल महाजन, पंडित पाटील ,अशोक ढाके,टीव्ही पाटील ,सौ वैशाली पाटील,यशवंत वारके,सौ यमुनाबाई वारके, श्रीमती रजनी राणे, सोपान नेमाडे,खाचणे सर ,गणेश सरोदे,ज्ञानदेव पाटील,दिलीप चौधरी,दिलीप मराठे, पांडुरंग पाटील, श्रीमती विजया भारंबे,श्रीमती प्रमिला धांडे आदी उपस्थित होते.

  • विश्र्व प्रसिद्ध मूल्यांकन शिक्षण स्पर्धेत कृष्णा तुषार चौधरी यांचे यश व सत्कार

    विश्र्व प्रसिद्ध मूल्यांकन शिक्षण स्पर्धेत कृष्णा तुषार चौधरी यांचे यश व सत्कार

    भुसावळ: येथील सेंट अलॉयसियस हायस्कूलमधील इयत्ता पाचवीतील विद्यार्थी कृष्णा तुषार चौधरी याने पाच ते सात वयोगटात विश्र्व प्रसिद्ध मूल्यांकन शिक्षण स्पर्धेत यश संपादन केले आहे. ही स्पर्धा ISKCON संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या विद्यार्थ्याला विजेतेपद मिळाल्या बद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (ISRO) आणि चांद्रयान-३ मोहिमेचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांच्या हस्ते यांचे हस्ते बंगलोर येथे इलेक्ट्रिक सायकल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. या विद्यार्थ्याचे वडील सी ए तुषार चौधरी, भुसावळ येथे प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट आहेत तर त्यांची आई ज्योती चौधरी ह्या प्रोप्रायटर ई-टॅक्स सर्विसेस इंडिया ( आर टी ओ सर्विसेस ) आणि म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर म्हणून कार्यरत आहेत. भुसावळ शहराच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

  • जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त 70 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन

    जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या 34 व्या वर्धापन दिनानिमित्त 70 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन

    भुसावळ (प्रतिनिधी):जय मातृभूमी क्रीडा मंडळाच्या 34 व्या वर्धापन दिन आणि केंद्रीय क्रीडामंत्री तथा खासदार रक्षाताई खडसे यांच्या जन्मदिनानिमित्त भव्य 70 किलो वजनी गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन भुसावळ तालुक्याचे आमदार व महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योग मंत्री श्री. संजयजी सावकारे यांच्या हस्ते थाटात पार पडले.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक कांडेलकर, भारतीय जनता पार्टी भुसावळ उत्तर विभाग शहर अध्यक्ष संदीप सुरवाडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष संतोष चौधरी यांचा समावेश होता.स्पर्धेत आज गटातील सर्व सामने खेळविण्यात आले असून, उद्या पासून बाद फेरीचे रोमांचक सामने खेळले जाणार आहेत. 11 मे ते 13 मे दरम्यान आयोजित या स्पर्धेत जय मातृभूमी क्रीडा मंडळाचे पदाधिकारी व खेळाडू संपूर्ण मेहनत घेत असून, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.

  • ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताची ठोस कारवाई – दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांचा खात्मा

    ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे भारताची ठोस कारवाई – दहशतवाद्यांच्या ९ अड्ड्यांचा खात्मा

    पहलगाम येथे १५ दिवसांपूर्वी झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्याचा बदला घेत भारताने मंगळवारी रात्री १:४४ वाजता ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले.

    हल्ल्याची ठिकाणे:

    पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील: बहावलपूर, अहमदपूर, मुरीदके

    पाकव्याप्त जम्मू व काश्मीरमधील: बाग, मुझफ्फराबाद, कोटली

    संरक्षण मंत्रालयाचे निवेदन:हे हल्ले केंद्रित, तोलूनमोलून केलेले आणि प्रक्षोभक नसलेले होते.कोणत्याही पाकिस्तानी लष्करी किंवा नागरी ठिकाणावर हल्ला केला नाही.

    लष्कराचे वक्तव्य:भारतीय लष्कराने ट्विटरवर लिहिले – “न्याय झाला आहे. जय हिंद!”तसेच, लष्कराने एक संदेश पोस्ट केला: “प्रहाराय सन्निहिताः, ज्याय प्रशिक्षिता” – अर्थात “हल्ला करण्यास तत्पर, विजयाच्या प्रतिक्षेत.”सीमावर्ती तयारी:भारतीय लष्करी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भारत-पाक सीमा भागात सर्व हवाई संरक्षण युनिट्स अलर्ट अवस्थेत आहेत.पाकिस्तानची प्रतिक्रिया:पाक लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी हल्ला झाल्याचे मान्य केले आहे, मात्र त्याची तपशीलवार प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही.भारताने या कारवाईतून स्पष्ट संदेश दिला आहे की, दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांनाही जबाबदार धरले जाईल आणि देशाच्या सुरक्षेसाठी कोणतीही कारवाई करण्यास भारत मागे हटणार नाही.