भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मारकास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी अभाविप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
या कार्यक्रमानंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी जमलेल्या बांधवांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव शाखेच्यावतीने सरबत व पाण्याचे वाटप करण्यात आले. उन्हाच्या तीव्रतेतही उपस्थित बांधवांची सोय लक्षात घेऊन ABVP ने हा उपक्रम राबवला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग संयोजक भावीन पाटील, जिल्हा कार्यालय प्रमुख प्रतीक साळी महानगर सहमंत्री चिन्मय महाजन महानगर एस एफ डी संयोजक गणेश दुसाने विद्यापीठ नगर मंत्री गौरव राजपूत आणि इतर कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम भविष्यातही सातत्याने राबवले जातील, असे अभाविप च्या वतीने सांगण्यात आले.

जाहिरात 👇


Leave a Reply