भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात आज राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. पी. फालक होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संबोधित करीत असताना प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी सांगितले की राजर्षी शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे प्रणेते होते. त्यांनी अस्पृश्यता, जातिभेद, आणि सामाजिक विषमतेविरुद्ध लढा दिला. बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली केली.
शाहू महाराजांनी पहिल्यांदाच मागासवर्गीयांसाठी मोफत व सक्तीचे शिक्षण सुरू केले. त्यांच्या विचारांमुळेच आज समाजातील वंचित घटक मुख्य प्रवाहात आले. त्या सोबतच त्यांनी स्त्रियांसाठी स्वतंत्र शाळा आणि शिष्यवृत्ती योजना सुरू केल्या, हे त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरण आहे. अशा पद्धतीने शाहू महाराज हे समाजप्रबोधनाचा एक आदर्श मानले जातात. ते विचारवंत समाजसुधारक होते. त्यांचा आदर्श विद्यार्थ्यांनी आचरणात आणावा, असे आवाहन प्राचार्यांनी केले.
कार्यक्रम प्रसंगी इतिहास विभाग प्रमुख प्रा श्रेया चौधरी यांनी मनोगत व्यक्त करीत असताना सांगितले कीआजच्या काळातील परिस्थती लक्षात घेता आज समाजाला सामाजिक समता, बंधुता आणि समावेश या मूल्यांची आवश्यकता अधिक आहे. म्हणून शाहू महाराजांचा विचार तरुण पिढीने अंगीकारला पाहिजे.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी प्रा डॉ संजय चौधरी, प्रा डॉ जयश्री सरोदे, प्रा डॉ गोविंदा वाघुळदे, प्रा डॉ अनिल सावळे, प्रा डॉ जगदीश चव्हाण, प्रा डॉ अंजली पाटील, प्रा डॉ माधुरी पाटील, प्रा निर्मला वानखेडे, प्रा संगीता धर्माधिकारी, प्रा एस डी चौधरी, प्रा डॉ दयाघन राणे, प्रा एस एस पाटील, प्रा डॉ एस व्ही बाविस्कर प्रा डॉ आर बी ढाके यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ अनिल सावळे यांनी केले आभार प्रा डॉ जे बी चव्हाण यांनी मानले.

Leave a Reply