भारताची दहशतवादावर जोरदार कारवाई: अझहर मसूद व हाफिज सईदच्या अड्ड्यांवर हल्ला

भारताने दहशतवादाच्या विरोधात मोठी आणि ठोस पावले उचलत जैश-ए-मोहंमद आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांवर जोरदार हल्ला केला. सूत्रांच्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने लढाऊ विमाने व क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने ही कारवाई केली.हल्ल्याची ठिकाणे व लक्ष्य:पंजाबमधील बहावलपूर येथे जैश-ए-मोहंमदच्या लपण्याच्या ठिकाणांवर हल्ला करण्यात आला.जैशचा प्रमुख अझहर मसूद काही दिवसांपासून पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI च्या सुरक्षित अड्ड्यावर लपून बसल्याची माहिती आहे.यासोबतच पाकव्याप्त काश्मीर (POK) मधील मुझफ्फराबाद आणि कोटली येथे लष्कर-ए-तोयबाच्या अड्ड्यांवरही तडाखेबंद कारवाई झाली.

हाफिज सईदच्या अड्डाला धक्का:लष्करचा प्रमुख हाफिज मोहमंद (सईद) ISI च्या सेफ हाऊसमध्ये असल्याचे उघड झाले असून, त्या परिसरालाही लक्ष्य करण्यात आले.

source https://x.com/ANI

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *