भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर दिनकर जावळे यांना तेजोदीप नव विचार फाउंडेशन नाशिक तर्फे सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल तेजवरत्न 2025 पुरस्कार जाहीर झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तेजोदीप नवविचार फाउंडेशन नाशिक ही संस्था विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असून दरवर्षी या संस्थेतर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ना तेजोरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यामुळे यंदाचा सामाजिक क्षेत्रातील तेजोरत्न पुरस्कार 2025 भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांना जाहीर झालेला आहे. शिशिर जावळे गेल्या 22 वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शिशीर जावळे हे वयाच्या चौदाव्या वर्षापासून समाज कार्य करत असून, समाजातील प्रत्येक घटकांशी जोडलेले आहेत. ते समाजाच्या प्रश्नांसाठी नेहमी पुढे असतात. गोरगरीब जनतेची सेवा, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थी समस्या, आरोग्य सेवा यात नेहमीच त्यांचा अग्रक्रम असतो. तसेच त्यांनी स्वतःच्या हिमतीवर कळस गाठला असून ते भारतीय जनता पार्टी मध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून तळागाळात काम करत आहेत. कुठलीही समस्या मांडताना न कचरता, आंदोलन असो किंवा मोर्चे असोत , कुठल्याही बातम्या असोत, अन्यायाविरोधी लढा असो, प्रत्येक कामात सक्रिय कार्यकर्ता म्हणून पुढे असतात. शिशीर जावळे हे समाजातील प्रत्येक घटकांशी जोडलेले आहेत. ते समाजाच्या प्रश्नांसाठी नेहमी पुढे असतात. गोरगरीब जनतेची सेवा, शेतकऱ्यांचे प्रश्न, विद्यार्थी समस्या, आरोग्य सेवा यात नेहमीच त्यांचा अग्रक्रम असतो. तसेच त्यांनी स्वतःच्या हिमतीवर कळस गाठला आहे.कुठलीही समस्या मांडताना न कचरता, आंदोलन असो किंवा मोर्चे असोत , कुठल्याही बातम्या असोत, अन्यायाविरोधी लढा असो, प्रत्येक कामात सक्रिय कार्यकर्ता म्हणून पुढे असतात. गोरगरिबांना सर्वांनाच शासनाच्या विविध योजनांची माहिती पुरवून त्यांना त्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी ते अहोरात्र झटत असतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी तसेच कौशल विकास अभियानांतर्गत त्यांनी विविध उपक्रम राबविले आहे बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी सातत्याने ते प्रयत्नशील असतात.विद्यार्थ्यांना बेरोजगारांना विविध शासकीय परीक्षांचे योजनांचे मोफत मार्गदर्शन करून त्यांना मोफत फॉर्म भरून देण्याचे सुद्धा ते कार्य करतात. तसेच ओबीसींच्या सर्वांगीण कल्याणासाठी ते सातत्याने शासन दरबारी लढा देत आहे .ओबीसी समाजाचा आणि लेवा समाजाच एक युवा नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. लेवा समाज आर्थिक विकास महामंडळाच्या स्थापनेसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला आहे त्यात सुद्धा त्यांचं फार मोठे योगदान आहे.
लेवा समाजाच्या सर्वांगीण उत्थानासाठी सुद्धा त्यांनी लेवाहितवादी चळवळ सुरू केलेली आहे. शासन दरबारी विविध सामाजिक प्रश्नांसाठी सातत्याने ते पाठपुरावा करून ते कार्य तडीस नेतात.
सध्या ते १) प्रदेश सचिव भा.ज.पा ओ.बी.सी मोर्चा, (म.रा.)
२) संचालक सदस्य-वै.ह.भ.प.संतवै.ह.भ.प.संत तोताराम महाराज नवचैतन्य समाज मंडळ. जळगाव
३)महाराष्ट्र राज्य प्रदेश संपर्कप्रमुख –लेवा उत्थान फाउंडेशन ४) संस्थापक अध्यक्ष — साई निर्मल फाउंडेशन भुसावळ जिल्हा जळगाव
५) मा.जिल्हा संपर्क प्रमुख — हिंदु जागरण मंच भुसावळ जिल्हा
६) सदस्य स्वावलंबी भारत अभियान भुसावळ जिल्हा
७) मा.सदस्य — जिल्हा पुरवठा दक्षता समिती सदस्य
८) लेवा हितवादी चळवळ प्रणेते. यासह अनेक सामाजिक संघटना आणि संस्थांमध्ये विविध पदांवर कार्यरत आहे. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी नाशिक येथे.
तेजोदीप नव विचार फाउंडेशन तर्फे मान्यवरांच्या हस्ते तेजोरत्न पुरस्कार 2025हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
जाहिरात 👇



Leave a Reply