रक्षाबंधन भाऊ-बहिणीचआपुलकीच नात कायम ठेवणारा सण त्यासाठी वृक्ष असणे गरजेचे- डॉ. सुरेंद्रसिंग पाटील

हिंदू धर्मात रक्षाबंधन हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहिण भावाची पूजा करून राखी बांधत असते त्या राखीला जो दोरा असतो तो बांधून कायमस्वरूपी रक्षा करण्याचं वचन भावाकडून घेत असते. तसेच भाऊ निरोगी राहून त्यांची उत्तरोत्तर प्रगती होवो अशी ईश्वरास विनंती करते. दोघा बहिण भावांना एकमेकांची काळजी असते. हिंदू धर्मात बहीण भावाचं नातं पवित्र असतं.

बहिण आणि त्यांच्या मुलांना मामाच्या गावाला येण्याची खूप मोठी गोडी असते सद्यस्थितीत वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात गर्मी असते त्यामुळे त्यांना बाहेर मैदानी खेळ खेळता येत नाही तरीसुद्धा काही वेळेस ते आजारी पडतात पूर्वी बहुसंख्य ठिकाणी गावरान आंब्याची झाड होती त्यामुळे उन्हाळ्यात तर मजाच मज्जा होती प्रत्येक गावाबाहेर चिंचेची झाड होती आता त्या झाडांची संख्या नसल्यात जमा आहे ज्याप्रमाणे झाडांना झोके बांधले जात संपूर्ण श्रावण महिना अक्षय तृतीया दिवाळी विविध सणांना झाडांना झोके बांधून सर्वजण झोके खेळत व मनमुराद आनंद लुटत आता सद्यस्थितीत घराबाहेर झोके बंगई नैसर्गिक हवेसाठी बांधलेले असतात

सद्यस्थितीत काही कारणास्तव दीर्घ काळापासून असलेली मोठ मोठी झाडे काटावी लागत आहे व नवीन झाडे कमी प्रमाणात लागत आहेत त्यामुळे पर्यावरणाचा समतोल डामा डोल झालेला आहे त्यामुळे वातावरणात खूप गर्मीच वातावरण असल्यामुळे ते झोके धूळ खात पडलेले आहे . प्रत्येकाला आपली बहीण तिच्या मुलांबरोबर आपल्या माहेरी यावी तसेच आपल्या बहिणीला सुद्धा त्यांच्या ननंद व त्यांचे मुलं तिच्या घरी थोडे दिवस थांबण्यासाठी यासाठी विविध प्रकारचे फळ फुलांचे तसेच ऑक्सिजनयुक्त टिकाऊ वृक्ष लावणे गरजेचे आहे. एक पेड माँ के लिये अभियान 2 त्याच्यातही आपला सहभाग दिसेल

डॉ .सुरेंद्रसिंग पाटील पर्यावरण जागर प्रतिष्ठान तसेच निसर्गासही पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण अत्यंत गरजेचे आहे सर्वांना निरोगीआरोग्यासाठी संगोपणासहित वृक्ष लावणे गरजेचे आहे शक्यतो आपल्या बालपणी म्हणजे लग्नापूर्वी घरातील सर्व सदस्यांनी काही वर्षे आधी जर वृक्ष लावले तर आपणास झाडांना झोके बांधता येतील घरातील वातावरण शुद्ध राहील व निसर्गातील मोकळी हवा सर्वांना मिळेल ज्यांना भाऊ नाही त्यांनी वृक्षदेवतेला आपला भाऊ म्हणून राखी बांधावी वृक्ष देवता सावलीच्या रूपात आपल्याबरोबर राहील सद्यस्थितीत फार मोठ्या प्रमाणात काही कारणास्तव वृक्षांची संख्या कमी होऊन आपणास फार मोठे संकटास सामोरे जावे लागत आहे त्यामुळे आपण निसर्गाचे काही देणे लागतो वृक्ष लागवडीत लक्ष दिल्याने आपणास कुठलीही उणीव भासणार नाही व अनपेक्षित रित्या काही ना काही प्रमाणात आपली निसर्गास मदत होईल .

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *